Thursday 2 March 2017

❤❤❤कॅन्सर च्या रुग्णाचा अभ्यास करून आयुर्वेदीय औषधी आणि संप्राप्ती इत्यादींचा विचार करताना "चरकस्तु चिकितसीते " चाच पुनःप्रत्यय आला , अर्बुदाची ( मासार र्बु द ,रक्तार्बुद )संप्राप्ती लावताना वातरक्ताच्या उपद्रवा मद्धे अर्बुद हा शब्द आला आहे इतकेच नव्हे तर कॅन्सर च्या आत्ययिक अवस्थेचेच वर्णन तिथे इतर लक्षणे देऊन हि आले आहे , यातील कुठलीच गोस्ट हृ दया मद्धे मूळ श्लोकी आलेली नाहीये , त्या एका सूत्र वरून वातरक्त, रक्तपित्त, विसर्प, कुष्ठ इत्यादी विकारातील निदान सेवनामधील साधर्म्य हि लक्षात आले त्याचा परिणाम म्हणून वर उल्लेखित विकारा कडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आणि कॅन्सर च्या चिकित्सेची नवीन दालने उघडली जाऊन रुग्णांना अतिशय आणि वि सम् यकारक परिणाम दिसू लागला, आणखी "उत्खनन "करताना अस ही आढळलं कि रक्त दूषित होऊन जेव्हा मास धातूला बिघडवतो तेव्हाच अर्बुदो त्पत्ती होते , अशी ही अर्बुदे "विरेचन साध्य" आहेत ,यातून इतका दिलासा लोक मानसाला देता येतो की" दर दोन महिन्याने विरेचन उपक्रम आणि शरदात रक्तमोक्षण करीत जा" कि या आजाराची संप्राप्ती घडणारच नाही ,आणि गेली 20 वर्षे याचा प्रयोग अने क रुग्णावर केल्यावर असं दिसतंय कि ओपेशन करून आलेल्या रुग्णांना या विचाराने ट्रीटमेंट दिल्यावर 100 पैकी 90 वेळा त्यांना कॅन्सर रेलैप्स होत नाही,  आता याच डॉक्युमेंटशन हि सुरु केलं आहे, याही पेक्षा प्रचंड आनंद देऊन गेलेली गोस्ट तर चरकाचार्यां विषयी चा आदर आणखीनच वाढविते ,अर्बुदा मद्धे विरेचन वापरा हा चरकादेश आल्यावर " हरितकी पंचरसा अ लवणा तुवरा परम ,,, श्लोक आठवला आणि मनी विचार केला की हे कॅन्सर चे लोक खूप मीठ खातात आणि सांगून हि मीठ बंद करीत नाहीत , तर लवण रहितं पंचरसाची हरितकी दिल्यास त्या रुग्णाच्या शरीरात षडरस होतील आणि " सर्व रसाभ्यासह् बल वर्ण करा नाम श्रेष्ठह "असे घडेल ,आणि विचारला पुष्टी मिळावी म्हणून चरक अर्श रोग चिकित्साध्याय काढून अभ यारीस्ट काढून पाहिल त्यात चरकानी अर्बुदाचा स्पस्ट उल्लेख केला आहे इतकच नाही तर अर्श आणि म्हणून अर्बुद साठी त्याचा " नित्य अभ्यास/ सेवन हि सांगितलं आहे , हे फक्त आणि फक्त चरकच करू शकतात, या विचारांनी किती लोकाचे जीव वाचले आहेत याची फक्त आपण कल्पनाच करू शकतो, किडनी failure च्या संबंधाने आलेला अनुभवही असाच सघन आहे, मूत्राच्या विवर्णतेचा उल्लेख हृदया मद्धे कास रोग अध्यायात आला आहे जो कि अनाठायी वाटतो परंतु श्वासाच्या वेगावस्थेत आयुर्वेदीय, allopathic, होमिओपॅथिक, कोणतेही meds दिले तरी मूत्रोत्पत्ती जास्तीची होऊन दम्याचा वेग कमी होतो, तसेच अपघातात छातीला मार लागून मेलेले रुग्ण रक्ताची मूत्र प्रवृत्ती होऊनच मरतात हे प्रत्यक्ष सत्य आहे त्या मुळे कास,श्वास आणि क्लेद मूत्र आदीचा संबंध स्पस्ट होतो,हृदया मद्धे तिथे ताडगोळ्याचं आणि भुई कोहल्याच तूप कास आणि मूत्र विवर्णता एकत्र असल्यास वापरण्यास सांगितलं आहे,म्हाताऱ्या माणसांना( 60 +) खूप दिवसाचा कास असताना मूत्र परीक्षण केल्यास खूपच pus सेल्स आढळतात ,इतर काहीच लक्षण नसतात अश्या वेळी हि तुपे सद्यह गुण देतात, तर हाच विषय चरकात मांडलेला पाहिल्यास त्यात कदंब फळाचे घृत हि वापरण्यास सांगितलं आहे, वाग्भटाचार्यांना ग्रंथ पद्यात लिहिताना कदाचित अडचण आली असेल काय म्हणून हे द्रव्य वगळले असेल? का " नातीसंक्षेप विस्तारम"असेल? काहीही असो पण हृद्रोग,किडनी failure, आणि मूत्र विवर्णता असताना केवळ आणि केवळ कदंब सिद्ध घृतच उपयोगी पडते हे हि दुर्लक्षित करता येत नाही, हे तूप शोधायला आपल्याला कदाचित आयुष्य खर्च कराव लागलं असत आणि तरीही ते जमल असत का नाही माहित नाही ! त्या मुळे चरकच नव्हेत प्रत्येक ग्रंथच अगदी बाड हि महत्वाची आहेत, अमल वेतस म्हणून बिलकुल आंबट न लागणार जे घाणेरडे द्रव्य " बनिये" विकतात त्या ऐवजी महाराष्ट्रीय वैद्यांनी कोकम,रातांबा,आमसुल वापरावा हा आदेश बाडांचाच आहे की जो तीथे नक्की ,हुकमी गुण देतो( गुद गत परिकर्तिकेची ज्वरपेया अमल वेतस घालून देणे , गुद मार्गातील स्वेदाचाक्षय मानून स्फुटनं त्वचा= परिकार्तिका) हृद याचा विषय चालला य पण न राह् हुन लिहिलं गेलं कारण फक्त वाग्भट असं नको ना सगळेच जण हवेत वाटू लागलं आणि म्हणून लिहून काढलं ,दुसऱ्या ग्रुप साठी लिहिलेली पोस्ट❤❤❤

by ,.
गुरुवर्य जमदग्नि सर
🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌷🌹